8/28/08

शिवाजींच्या शोधात

शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर आणि त्यांनी केलेल्या कार्याबद्दल गैरसमाजाचे जणु गेल्या काही वर्षात पीक आलेले आहे. शिवाजी महाराजांच्या नावाचा जो तो हवा तसा वापर करतो आणि वैयक्तिक फायद्यासाठी शिवाजींनी केलेल्या महान कार्याचा हवा तसा अर्थ लावतो. या भानगडीत मराठी लोकांचा मोठा हिस्सा आहे. याचा परिणाम असा झाला की ही महान व्यक्ति केवळ महाराष्ट्रापुर्तीच सिमित राहिली. या गैरवापराचे आणि गैरसमजाचे अनेक पैलु मला गेल्या काही वर्षात लक्षात येता आहेत त्या वर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या लेखात मी करतो आहे. ज्या व्यक्तीने आपले संपूर्ण आयुष्य भारताला 'यवन-तुर्कांच्या' पंज्यातून सोडविण्या साठी वेचले त्याच भारतात हा व्यक्ति आज महाराष्ट्रा पलिकडे चोर-लुटारू म्हणुन ओळखल्या जातो हे आपल्या मराठी पिढीचे अपयश आहे. उत्तर भारतात तर 'पवित्र' मुघलांविरुध्द लढण्याचा पातक जणु शिवाजींनी केलेले आहे या दृष्टीने त्यांच्याकडे बघितल्या जाते. याला ऐतिहासिक आणि ऐतिहासिक - राजकीय तसेच सांप्रत - राजकीय अशी अनेक कारण आहेत. ऐतिहासिक कारणांचा विचार आपण पुढल्या लेखात करुया आणि राजकीय कारणांचा विचार या लेखात कर या.

सुप्रसिध्द इतिहासकार श्री जादुनाथ सरकारांनी मी "द हाउस ऑफ शिवाजी" या पुस्तकाच्या शेवटी महाराष्ट्रा बद्दल फार सुरेख लेख लिहिला आहे. त्यांच्या मते गेल्या हजार वर्षाच्या गुलामगिरीत महाराष्ट्राची जमात जणु सूर्यासारखी भारतीय इतिहासावर वर झळकते. तलवार आणि लेखणी सातत्याने आणि तितक्याच कुशलतेने चालविण्याचा मान फक्त मराठी लोकांनाच जातो. शिवाजी महाराजांनी फुंकलेल्या स्वातंत्र्य रणदुंदुभीचे पडसाद टिळक-सावरकरांद्वारे आपल्याला वीसाव्या शतकातही ऐकु येतात. पण इंग्लीश सत्तेने भारतीय जनमानसाचा चेहरा-मोहराच बदलवुन टाकला त्यामुळे हे पडसाद महाराष्ट्रा व्यतिरिक्त भारतीयांना घोंगाट वाटु लागले. भारतीय विचारसरणी बदलली तरच भारत आपला खर्‍या तर्‍हेनी गुलाम होईल हे इंग्रजांनी बरोब्बर हेरले. त्यासाठी त्यांनी दोन आघाड्यांवर काम सुरु केले. एकतर भारतीय इतिहासाला वाट्टेल तसा आकार द्यायचा आणि दुसर म्हणजे भारतीयांना त्यांच्या इतिहासाबद्दल लाज वाटेल याची व्यवस्था करायची. या अंतर्गत शिवाजी कसा वाईट माणुस होता आणि त्याच हिंदु राष्ट्र कल्पना कशी खोटी होती. तो साधा चोर-लुटारू होता आणि अत्यंत स्वार्थी असा त्याने मुघलांशी टक्कर केवळ स्वतःचे राज्य वाढविण्यासाठी केली इत्यादी धादांत खोट्या कल्पना आणि समजुती त्यांनी भारतीयांच्या मनावर बिंबविण्यास आरंभ केला. थोडक्यात शिवाजी महाराज हे सार्वभौम राजे नसुन मघली सत्तेत पुंडाई करणारा साधा सरदार होता हे भारतीयांच्या मनात बिंबविले की भारतीय जमात परकीय सत्तेविरुध्द उठाव करण्यास कशी असमर्थ आहे आणि परकीय सत्ते मुळेच आत्ता पर्यंत भारतीयांचा विकास झालेला आहे हे दर्शविणे सोपं जात. या प्रकल्पात इंग्रज बरेच यशस्वी ठरलेत. बहुतांश ऐतिहासिक पुस्तकात शिवाजींना हिन मानल्या जात. माझ्या वाचनात १८४० साली लिहिलेल्या कोण्या इंग्रज अधिकार्‍यानी लिहिलेल्या पुस्तकाची प्रत आली. पुस्तक लहानस आहे आणि त्यात औरंगझेब कसा मुघल सत्तेच्या विनाशास कारणीभूत आहे हे दाखविण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. त्या पुस्तकातही शिवाजींना शूर म्हटल आहे पण शिवाजी केवळ चोर दरोडेखोर असेच म्हटले आहे. अमेरिकेत उपलब्ध असलेल्या (आणि माझ्या वाचनात आलेल्या) जागतिक इतिहासावर भाष्य करणार्‍या बहुतांश पुस्तकात शिवाजींचा उल्लेखही नसतो. मुघलांचा जरूर असतो. आणि मुघलांनंतर सरळ ती पुस्तके इंग्रजी सत्तेवर येतात. कहर म्हणजे मुघल सत्तेचा शेवट म्हणे १८५७ साली झाला अस सरळ सरळ सगळ्या पुस्तकात छापलेलं आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या विलियम डर्लिम्पेल यांनी लिहिलेल्या "द लास्ट मुघल" या पुस्तकाचा सूरही असाच आहे.

लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी की ही सगळी पुस्तके इंग्रजीतच आहेत. मराठी लोकांवर अर्थातच याचा परिणाम झाला नाही पण उत्तर व पूर्व भारतात शिवाजींना चक्क चोर म्हटल्या जात ते या कारस्तवच. आणि जाब विचारला तर वर सांगितल्या प्रमाणे इंग्रजी पुस्तकांचा पुरावा दिल्या जातो. युरोप-अमेरिकेत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच सोडा पण भारताच्या पहिल्या पंत-प्रधान नेहरूंनी त्यांच्या पुस्तकात (द डिस्कवरी ऑफ ईंडिया") शिवाजींचा उल्लेख चोर-दरोडेखोर असा केला आहे. आत नेहरू शंख माणूस होता हा भाग निराळा मानला तरी पुस्तकात शिवाजींबद्दल असला लिहिण्याची त्यांची हिम्मत झालीच कशी? शिवकालीन इंग्रज आणि पोर्तुगिजांची पत्रांमधुन महारजांबद्दल लिहिल्या गेल्याचे सूर १८ व्या व १९ व्या शतकातील इंग्रज इतिहासकारांच्या पुस्तकांतुन उमटतात. या दरम्यान इंग्रजी माध्यमातुन शिकलेल्या किंवा इंग्लंडमधेय शिकलेल्या भारतीय मध्यम वर्गीय (महाराष्ट्रा व्यतिरिक्त) व्यक्तिंनी लिहिलेल्या पुस्तकातून परत तेच दिसते. त्यामुळे नेहरूंनी जे लिहिले ते नविन नव्हते फक्त त्या विकृत, नेभळट आणि शंढ विचारसरणीचे रोपटे नेहरू पुन्हा स्वंतत्र्य भारतात पुन्हा रोवत होते.

स्वातंत्र्योत्तर काळात कम्युनिस्ट लोकांची पकड भारतीय इतिहासावर संशोधनावर अजगरासारखी आहे आणि भारतीयांना त्यांच्या इतिहासाबद्दल मुळीच स्वाभिमान वाटु द्यायचा नाही हेच या मिंध्या श्वान जातीच्या कम्युनिस्टांच लक्ष आहे. इंग्रजाची हि नीती भारतीय कम्युनिस्ट पुढे नेता आहेत हि परिस्थिती थोडी हास्यापद, फार घातकी आणि विकृत आहे. या गुलामगिरीच्या मनोरुग्णांनी शिवाजींना इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून नामशेष केल किंवा एक साधा राजा ज्याने मुघलांविरुध्द लढा दिला यापूर्तीच त्यांना सिमित केल. त्यामूळे झाल काय की शिवाजींनी मुघलांविरुध्द लढा का दिला आणि त्यात त्यांचा तिळमात्र स्वार्थ कसा नव्हता हे महाराष्ट्रा पलिकडे कोणालाच कळत नाही. मराठा साम्राज्याच्या सीमा आज भारताच्या सीमा आहेत. याचा अर्थ शिवाजींचे भारतीय इतिहासात किती अधिक महत्त्व आहे हे महाराष्ट्रेतर जनतेला कळत नाही. पण हा भाग सांप्रत राजकारणत मोडतो आणि यावर आपण पुढल्या भागात चर्चा करु या.

शिवाजी महान होते यात काही वाद नाही. मग त्यांना सर्व भारतीयांसमोर महान सिध्द करण्याचा अट्टहास का हा प्रश्न उभा रहाण सहाजिक आहे. राजे सार्वभौम सत्तधीश होते. त्यांनी विशिष्ट कारणांस्तव स्वतःचा राज्याभिषेक केला. त्यात त्यांचा वैयक्तिक स्वार्थ मुळीच नव्हता. या अपूर्वाई ला भारतीय इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे. त्यांचा मुसलमानी सत्तांविरुध्द लढा आणि मुख्यत्वे मुघलांविरुध्दच्या लढ्यामागे विशिष्ट विचार प्रणाली होती. त्यांच्या जन्माआधी उत्तर भारतीय उपखंड मुसलमानी सुलतानांचे पाय धुण्यात निपुण झाला होता तर दक्षिणी भारतात भाऊ-बंदकित व्यस्त आणि परकीय आक्रमकांनी घातलेल्या विध्वंसाशी विन्मुख होता. अश्या परिस्थितीत भारतीयत्वाचे रक्षण करण्यासाठी महाराजांनी तलवार उचलली आणि जन-मानसात स्वाभिमान जागृत केला. गेल्या तीनशे वर्षात महाराष्ट्रात झालेल्या समाजोत्थनाचे मूळ महाराजच आहे. पण त्यांचे कार्य महाराष्ट्रापूर्तीच सिमित नाही ते कार्य संपूर्ण राष्ट्राची धरोहर आहे. आणि ही गोष्ट्र महाराष्ट्रेतर समाजास समजवण्यासाठी प्रयत्न करण्यात वावग काहीच नाही.

8/17/08

निर्माल्य - भाग २

श्रीकांतनी सायकल भरधाव वेगानी अंगणात घातली. वर्‍हांड्यात फतकर मारून बसलेल्या माईंना बघुन त्यांनी सायकल चालतीच सोडुन उडी मारली. सायकल विहिरीच्या कडेला दाणकन जाऊन आदळली.

"आई, आई काय झाल?"

माईंनी काही उत्तर दिलं नाही. वरची दोन बटनं सोडलेला शर्ट, खर्रा खाऊन रंगलेल तोंड आणि चोपून मागे केलेले केस अश्या श्रीकांतकडे त्या नुसत्या बघत होत्या. श्रीकांतला सायकल दामटुन श्वास लागला होता. त्याला काहीतरी अर्धवट बातमी कळली होती. त्याच्या डोळ्यात अपराधी भाव होते. माई काहीच बोलत नाही बघुन तो "वहिनी, वहिनी" हाका मारत धावत घरात गेला. आतुन परत रडण्याचे आवाज येऊ लागलेत. श्रीकांत परत धावतच बाहेर आला. सारं घर स्तब्ध होत. आकाशात ढग दाटलेले होते. आणि पान ही हलत नव्हत. अश्यात फक्त श्रीकांतच धावपळ करत होता. त्याने माईंना मिठी मारायचा प्रयत्न केला. पण माईंनी काहीच हालचाल केली नाही.

"आई, तू रडू नकोस. मी आहे" असं काहीस म्हणत तो सायकल कडे धावला. सायकलचे पाईडल जोराने मारण्याच्या प्रयत्नात पाईडल त्याच्या पोटरीला खस्सकन लागले पण त्या कडे त्यांच लक्ष नव्हत. त्याने घाटाकडे सायकल हाणली.

घरात परत सुन्न झाले. पाऊस पडत नव्हता आणि गरमीने श्वास गुदमरायची वेळ आली होती.

"माई, आत या" कोणी मध्यमवयीन बाई उंबरठ्यावर उभी राहुन माईंशी बोलत होती.

"राहु दे इथेच मला. पोरीची काळजी घ्या" माई उत्तरल्या. श्रीकांत झंझावातात त्यांचे रडणे थांबले होते. त्यांच्या शुन्य डोळ्यातून गरम टपोरे अश्रु परत वाहु लागले.

त्यांचं लग्न नुकतच झाल होत तेंव्हाची घटना त्यांना आठवत होती. त्यांच्या सासुबाई त्यांना कोणा बाबा कडे कोंकणात घेउन गेल्या होत्या. बाबा एका झोपडी वजा खोलीत रहात असे. त्याची खोली विचित्रश्या कुबट वासानी भरली होती आणि अंगार्‍यांचा धूरात काहीच दिसत नव्हते. त्या बाबाच्या पायावर पडुन सासुबाईंनी हंबरडा फोडला. माई जेमतेम विशिच्या असतील तेंव्हा. ती घुसमटलेली खोलीने त्यांचा जीव दडपुन गेला होता आणि सासुबाईंच अभद्र रडण त्यांना असह्य झाल होत. "असं नका करू हो. दया करा. सूनेला सुख लाभु द्या" असं काहीस सासूबाई हुमसुन-हुमसून म्हणत होत्या. पण बाबाने हूं का चूं केलं नाही. थोड्या वेळानी सासूबाईंनी आणलेला प्रसाद बाबाच्या पायावर ठेवला आणि माईंना घेऊन त्या घरी परत आल्या. घडलेला प्रकार इतका भेसूर आणि विक्षिप्त होता की माईंना त्या बद्दल सासूबाईंना काही विचारण्याची हिम्मत झाली नाही. सासूबाईंनीही काही कधी सांगितल नाही. पण जायच्या वेळी मात्र "पोरी, पोरी" म्हणत सासूबाई आपले खरखरीत हात माईंच्या गोल चेहर्‍यावर सारख्या फिरवत असत. सासूबाई त्या बाबाच्या पाया पडुन का रडत होत्या हे जरी माईंनी कधी विचारल नसलं तरी त्याची प्रचिती त्यांना जन्मभर जणू यायची होती.

माई कणखर व्यक्तीमत्वाच्या होत्या. जन्मभर संसार त्यांनीच रेटला होता. जवळच्या शाळेतच त्या नोकरी करत असत. सध्या त्या मुख्याध्यापिका होत्या. शिस्तबध्द आणि करारीपणासाठी त्या प्रसिध्द होत्या. त्या काळात बायका फारश्या नोकरी करत नसतं. पण नोकरी करावीच लागली तर शिक्षण क्षेत्राकडे जास्त कल असे. माईंची नोकरी करण्यामागची कारणे थोडी निराळी होती. माई लग्न होऊन घरात आल्यात तर घर खाऊन-पिऊन सुखी होतं. त्यांचे यजमान, आपले अण्णा, मोठ्या सरकारी हुद्द्यावर नोकरीस होते. इतक्या लहान वयात एवढा पगार आणि एवढा हुद्दा म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात त्यांचं भविष्य उज्वल होत. लग्नानंतर यथावकाश माईंना दोन सोन्यासारखी पोरं झाली. सगळं कस चित्रपटातल्या सारख चालू होत. पण वाईट काळ दार खटखटवुन येत नाही आणि बाहेर हाकलून बाहेरही जात नाही. खुपदा तो घरचाच होऊन बसतो. घुशीसारखा घरातल्यांची आयुष्य कुरतडत बसतो.

अण्णा स्वभावाने थोडे विक्षिप्त होते पण त्यांना वेड लागणार आहे अस कोणाच्या डोक्यात आलं नसत. पण वयाच्या तीशीत त्यांना फिटस् चा त्रास सुरू झाला. सुरुवातीला औषध देऊन आराम पडत असे पण या रोगाला निदान नेमके असे निदान नाही. हळु-हळु औषधांचा परिणाम कमी होऊ लागला. त्रास अजुन वाढत जाणार याची ती लक्षण होती. घरातील एकट्या कमविणार्‍या व्यक्तीची होत असलेल्या दुर्दशेचे सावट सगळ्यांवर पडत होते. फिटस च्या त्रासाने अण्णांची मानसिक संतुलन बिघडत होते. लहान असली तरी पोरे वडिलांसमोर दबुन असत. कधी काही चूक नसतांना बेदम मार पडत असे तर कधी कप-बशी फोडली तरी मुके मिळत असत. पण अश्या परिस्थितीतही अण्णांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी माईंचे शिक्षण पुन्हा चालू केले. खरं सांगायच तर अजुन काही मार्ग नव्हताही. माई मुळात हुशार होत्या पण लग्न व्हायच्या वेळेस त्या बी. ए. च्या प्रथम वर्गात होत्या. पण लग्ना नंतर सहाजिकच त्यांच शिक्षण थांबल. सध्य परिस्थितीत मात्र बी.ए. ची पदवी मिळाल्यावर शिक्षिकेची नोकरी पक्की होती. घराजवळच सरस्वती महाविद्यालय होत. माईंनी मुंबईच्या महाविद्यालयात स्वतःचे शिक्षण सुरु केले.

मुंबईला दररोचच जाण-येण आणि घर बघण यात त्यांची फार धाव-पळ होतं असे. अण्णा आजकाल घरीच असत. पण त्यांची फारशी मदत नसे. पण त्यांची होत असलेली दशा माईंना बघवत नसे. त्यांनी खुप उपास-तापास चालू केले. अभ्यास आणि घरा-दारातून वेळ काढुन त्यांनी आजु-बाजुची सगळी मंदिर झाडुन काढलीत. जेजुरी-तुळजा भवानी झालं मंगेश आणि त्र्यंबकेश्वरही आटपला पण त्या हार मानायला तयार नव्हत्या. जे काही घडलय किंवा घडलय त्या मागे काही तरी कारणं असतात. कुठल्या कारणाशिवाय कसं काही घडणार? आपल्या सोन्यासारख्या नवर्‍यावर अशी परिस्थिती का यावी याचे उत्तर माई शोधत होत्या. स्वत:च्या आयुष्याशी दैव असला अघोरी झिम्मा का खेळत होता हे त्यांना आकलनी पडत नव्हते. त्यांना खरं सांगायच तर शिकण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यांना फक्त छान संसार करायचा होता. आपल्या नवर्‍याची सुखी ठेवायचे होते. पोरांना छान मोठं करायच होत. एवढ्या साध्या मागण्या त्या, काय चूक आहे त्यात? पण एवढ्या साध्या अपेक्षांचे मागणे देवाजवळ करण्याची पाळी त्यांच्यावर आली होती. आजु-बाजुच्या सगळ्यांचे संसार असेच चालू होते. सामान्य. पण ते सुध्दा माईंच्या नशिबी नव्हते. त्यांच्या तळहातावरच्या रेषा सामान्य नव्हत्या. अगम्य, अज्ञात अश्या त्या रेषांना जणु ऐका-मेकांचाही ठावठिकाणा नव्हता.

8/10/08

निर्माल्य- भाग १

मुंबईच्या इतक्या जवळ असुनही हे गाव थोडं विचित्र होत. ते अजुनही गावच होतं. मुंबईत माणसांचा क्षणाक्षणाला वाढणारा पूर आणि इथेय अजुनही जमिनीने हिरवा शालू नेसलेला होता. मुंबईकडे जाणार्‍या मुख्य रस्त्याहुन दोन मैल आत, आडवळणाला एक जुना वाडा होता. आजु-बाजुला सगळेच वाडे होते. स्वतःला कबुतरांसारख खुर्‍हाडात बंद करुन घेण्याची हौस इथे कोणांस नव्हती. वाड्याची बांधणी जुन्या पध्दतीची होती. कौलांच उतरतं छप्पर होतं. समोर वर्‍हांडा त्यापुढे आंगण. आणि मोठ्ठ परसदार अशी टुमदार बांधणी होती. दोन घरांमधे कुंपण नसल्यामुळे आवार मोठं भासत असाव. अंगणात विहिर होती. तीतं काही कासवं पोहत होती. आजुबाजुला गर्द झाडी होती पण परसदारी कोणीतरी लक्ष देउन झाड लावली होती. केळी, पेरु, फणसाची झाडं होती. आंबा पण होता. परसदार मातीचं होत आणि फरश्यांची पाउलवाट होती. घरातही काळ्या-भोर थंडगार फरश्या होत्या. परसात पाण्यांच भलं-मोठं टाक होत. एकतर कोकणात वर्षातून सहा महिने पाऊस आणि वरुन समोर अंगणात विहिर असतांना, हे टाकं थोडं मजेशीरच वाटत होत.


घरात शांतता होती. मुसमुसण्याचे आवाज ऐकु येत होते. नुकताच पाऊस पडुन गेला होता. वातावरण ओलं होत. वर्‍हांड्याच्या पायर्‍यांसमोर, अंगणाच्या मध्यभागी एक तरूण देह ठेवला होता. वर्‍हांड्याच्या एका टोकाला, लाकडी खांबाला टेकुन माई देहाकडे बघत बसली होती. त्यांचे डोळे शून्य होते. वर्‍हांड्याच्या दुसर्‍या टोकाला अण्णा शांतपणे पेपर वाचत आरामखुर्चीवर बसले होते. समोर देह ठेवला असतांना त्यांच पेपर वाचण अंगावर शहारे आणणारं दृश्य होतं. माईंनी गर्दीतील एकाला खुणेनी जवळ बोलावल.



"कोणाची वाटं बघणं चाललय?"
"वहिनी अजुन खोलीतून बाहेर आल्या नाहीयात. शेवटचा नमस्कार करायला हवा तीने"
"बरं. बघते मी काय करायच ते" असं म्हणत माई गुढघ्यांचा आधार घेत उठल्या आणि आत जाऊ लागल्या.
"माई"
माईंनी मागे वळुन बघीतल.
"श्रीकांत कुठेय?"
माईंनी मोठ्ठा नि:श्वास टाकला. काही उत्तर न देताच त्या माजघरात गेल्या.
"पोरी, शेवटचा नमस्कार करुन घे"
एक तरूण पोरगी लोखंडी पलंगावर पडलेली होती. आजु-बाजुला बायका रडत उभ्या होत्या.
"नाही आई मी त्यांना अस जाऊ देणार नाही"
"असं नकोस ग करु. चल, उठ. मी आहे तुझ्या सोबत." माईंनी सूनेला बळे-बळे उठवण्याचा प्रयत्न केला आणि हात धरुन अंगणात आणल. पण मृतदेह बघुन सूनेनी धाडकन आंग जमिनीवर टाकल.
पेपर टाकुन अण्णा धावत आलेत. कोणीतरी पाणी आणले.
"असं करुन कसं चालेल. नमस्कार करून टाक."
"मग तुम्ही सगळे लगेच त्याला घेउन जाल आणि मी ईथे एकटीच मागे राहीन." लहान मुलीसारखे हुंदके देत सून बोलत होती. माईंचा गळा भरून आला होता. त्यांच्या तोंडातून शब्द फुटेना.
सूनेनी कसातरी नमस्कार केला आणि ती परत बेशूध्द पडली. तीला उचलुन आत घेउन जावं लागल.
अंत्य-संस्काराची तयारी सुरु झाली.
"माई, अग्नी कोण देणार? श्रीकांतचा नेहमीच्या ठिकाणांवरही पत्ता नाहीया"
"कधीच परत नाही आला तरी चालेल" असं काहीस पुटपुटत "हे देतील" असं त्या म्हणाल्यात.
"अहो, ऐकता का? ऊठा, या लोकांसोबत जा आणि ते सांगतील तस करा"
हो म्हणत अण्णा लगेच उठलेत. "अगं पण माझा चहा व्हायचाय. ते मग तू करतेस का ते लौकर"
"अहो काय बोलताय तुम्ही? कळतय का चाललय ते? आपला अविनाश आहे हा." देहाकडे बोट दाखवत माई बोलल्या. बाईचा जीव अगदी कावुन गेला होता.
"आणि तुम्हाला चहाची पडलीय?"
अण्णांच्या आकलनी फारस काही पडलेलं दिसत नव्हत पण चहा मिळणार नाही एवढ मात्र त्यांच्या लक्षात आल.
"बरं, लगेच जायचं असेल तर मी ते आपलं म्हणजे बाहेरचे कपडे घालु की ते आपले घरातलेच चालतील"
माई मट्टकन जमिनीवर फतकर मारुन बसल्या व भकास डोळ्यांनी जमिनीकडे बघु लागल्यात.
पुरुष मंडळींपैकी कोणी तरी आत गेलं. नात्यातलंच असाव कारण त्याला घरातल काय कुठे आहेय माहिती होत. आत जाउन त्यांने झब्बा आणला.
"अण्णा झब्बा घाला आणि चला"
"अरे पण ते म्हणजे हा झब्बा घरातला आहे" अण्णा तक्रारीच्या स्वरात म्हणालेत.
त्या पुरुषाने जबरदस्ती अण्णांना झब्बा घालायला लावला आणि दंड पकडुन फाटकापाशी घेउन गेला.
माईंना रडू आवरत नव्हतं.
श्रीराम जय राम जय जय राम चा गजर झाला. लोकांनी तिरडी खांद्यावर टाकली.
अंगणात फक्त माईच उरल्या होत्या.
दूरून एक सायकल भरधाव घराच्या दिशेनी येतं होती.
(क्रमश:)

8/8/08

धार्मिक साम्राज्यवाद

सध्या मी श्री अनंत काकबा प्रियोलकर यांनी लिहिलेले 'गोवा इंक्विझिशन' हे पुस्तक वाचतो आहे. पोर्तुगिज लोकांनी गोव्यात हिंदु समाजावर जे अनन्वित अत्याचार केलेत त्यांचा हे पुस्तक लेखा-जोखा आहे. पुस्तकातील घटना वाचुन मला रात्री नीट झोप येत नाही. पुस्तकात वाचलेल्या गोष्टी भुता सारख्या डोळ्या समोर फिरतात. परकीय आक्रमकांनी भारतात मांडलेला हैदोस माझ्या साठी नवा नव्हे. मी मुसलमानी लोकांनी भारतात उभा केलेल्या रक्तरंजित इतिहास बराच वाचला आहे. थोडक्यात, धर्माच्या नावाखाली हे परकीय लोक कुठल्या थराला जाऊ शकतात याची मला पूर्ण जाणीव आहे. निदान अस मला वाटत असे. दु:खद बाब हि की मी चूक ठरलो. नुसत्या नंग्या तलवारी नाचवत, अल्ल-हो-अकबरच्या सैतानी आरोळ्या देत भारत नेस्तनाभूत करणारे मुसलमान, अत्याचारांच्या बाबतीत या पोर्तुगिजांच्या तुलनेत 'जच्चे-बच्चे' मानायला हवेत. उघडपणे रक्ताचे पाट वाहवण्याच्या ऐवजी कायदे संमत करुन लोकांचे धर्मांतर करण्यात पोर्तुगिजांचा हात कोणी धरु शकत नाही. आणि कायदे तोडल्यास, कायद्यां अंतर्गतच कत्ले-आम करण्यास ते मोकळे होते. संपूर्ण भारत जर का त्यांच्या अधिपत्या खाली असता तर काय झाले असते या विचाराने अंगावर शहारे येतात. बहुतेक काहीच राहिले नसते. दक्षिण अमेरिकेत त्यांनी मूळ रहिवास्यांपैकी फक्त एक टक्का लोक जिंवत ठेवले आहेत. उरलेल्यांना एकतर मारुन टाकले किंवा जबरदस्ती लग्न करुन मूळ रहिवास्यांचे रक्तच बदलवुन टाकले.

भारतात घातलेल्या हा थैमान भारतापूर्तीच सिमित नव्हता. युरोपिअन साम्राज्यावादाने असला थैमान जगाच्या प्रत्येक काना-कोपर्‍यात घातला. उत्तर व दक्षिण अमेरिकेत तेच घडले. ऑस्ट्रेलियातही तेच घडले. अफ्रिकेत तस करता येणं अशक्य होत म्हणुन तिथुन काळ्या लोकांना गुलाम बनवुन जगाच्या काना-कोपर्‍यात जाउन विकण्याचे काम या लोकांनी केल. सतराव्या व अठराव्या शतकात गुलाम-विक्रीचा धंदा फार नफ्याचा होता. जवळ जवळ दिड ते दोन करोड गुलाम अमेरिका खंडात विकल्या गेलेत. या गुलामांना ज्या दशेत अटलांटिक महासागर पार करुन अमेरीका खंडात नेण्यात येत असे याचे वर्णन कुठे वाचायला मिळाले तर प्रत्येकाने अवश्य वाचावे. मेंदु सुन्न होतो. अत्याचार करण्यात स्पॅनिश लोकांनी मध्य व दक्षिण अमेरीकेत पोर्तुगीज लोकांशी जणु चढा-ओढीची स्पर्धा होती. कोण जास्त लोकांना मारतो, कोण अधिक लोकांची धर्मांतर करतो या अभिमानाच्या गोष्टी असव्यात. फ्रेंच लोकांनी मध्य व उत्तर अफ्रिकेत तेच धिंगाणे केलेत. ब्रिटिश लोकांनी सध्य स्थितीत अमेरिका व कॅनडा मानल्या जात असलेल्या देशांमधे तसेच ऑस्ट्रेलिया खंडातील मूळ रहिवाश्यांना नाहिस केल. थोडक्यात हा नर-संहार सगळीकडे झाला. आशिया खंडात मुसलमानी लोकांनी केला (चेंगिझ खान पासुन तर मोहम्मद गझनवी पर्यंत) तर इतर खंडांमधे युरोपीय गोर्‍या लोकांनी केला.

मनात असा विचार येतो की सत्ता-पिपासु राज्यकर्ते असला संहार नेहमीच करत आले आहेत. आपली सत्त प्रस्थापीत करण्याच्या उद्योग मनुष्य जात जन्माला आल्यापासुन करते आहे. म्हणजे गेल्या हजार वर्षातील संहार हा याच मालिकेतील पानं आहेत. त्यात काही नविन नाही. पण गोष्टी इतक्या सोप्या नाहीत. नीट निरिक्षण केले तर भीषणता अधिक जाणवते. मी फार मोठ्या भौगोलिक प्रदेशाच्या इतिहासावर तसेच विविध संस्कृतीच्या लोकांवर भाष्य करतो आहे त्यामुळे मतभेदांना बराच वाव आहे. पण जगाच्या इतिहास पटलावर गेल्या हजार वर्षातील घटनांचा विचार केला तर साम्राज्यवाद पडसाद ठळकपणे जाणवतातच पण या साम्राज्यवादाच्या मूळाशी धर्मांधता होती हे लक्षात घेतले तर साम्राज्यवादाचे अत्याचार आकलनी पडतात.

मी माझ्यासाठी किंवा माझ्या फायद्या साठी लोकांना हिंसा करण्यास उद्युक्त केल तर या हिंसेची व्यापकता माझ्या जीवनकालापर्यंतच सिमित राहिल. मी मेल्यावर किंवा माझ्या वंशजांचा र्‍हास झाल्यावर माझ्या विचारप्रणालीचाही अंत होईल. पण या ऐवजी मी असा प्रचार सुरु केला की हि हिंसा आवश्यक आहे आणि त्याने देव प्रसन्न होतील किंवा लोकांचे धर्मांतर करणेच कर्तव्य आहे आणि धर्मांतरा साठी त्यांच्यावर राज्य करणे आवश्यक आहे आणि ती लोकं ऐकत नसतील तर त्यांना मारुन टाकणेच पुण्य कर्म आहे तर असली विचार प्रणाली शतकानुशतके टिकुन रहाते. आणि रंगमंचावर जशी पात्र बदलत असतात तसे सत्ता-पिपासु राज्य कर्ते किंवा धर्मांध जनता बदलली तरी इतरांवरचे अत्याचार चालूच रहातात.

युरोपातील राज्यकर्ते बदलत असले तरी पोर्तुगिज, स्पॅनिश आणि ब्रिटिश लोकांनी मांडलेला हैदोस जवळ-जवळ तीन शतके सर्रास चालूच होता. पुढेही तो चालूच राहिला असता पण युरोपीय लोक जिथे-जिथे गेलीत तेथील मूळ रहिवासी नामशेष झाले त्यामुळे अत्याचार करायला कोणी फारस उरल नाही. गुलाम म्हणुन आणलेल्या काळ्या लोकांचा तर अगदी २०व्या शतकातही छळ चालूच होता. मुसलमानी लोक ८ शतकापासून जग पादाक्रांत करायला निघालेत. ते बर्‍याचश्या प्रमाणात यशस्वी झालीत. जगाला दार-उल्-हब्र करणे हे पुण्यकर्म आहे हि समजुत असल्यामुळे राज्यकर्ते बदललेत, खलिफा नाहिसे झालेत तरी अत्याचार चालूच रहिलेत. दोन्ही घटनांमधील साम्य स्वधर्माचा आत्यंतिक आणि अनाठायी अभिमान, स्वधर्म प्रचाराची पराकोटीची ओढ आणि राजकारण व धर्म यातील पुसट रेखा ही आहेत. साम्राज्यवाद केवळ भूमी पादाक्रांत करून नैसर्गिक संपत्तीवर अधिपत्य गाजविण्यापूर्ती सिमित नव्हता. मूळ रहिवाश्यांना शारीरकरीत्या गुलाम करण्या सोबतच मानसिक रित्या गुलाम करण्याचा मुख्य उद्देश त्या मागे होता. आणि मानसिक गुलामगिरी धर्मांतराद्वारे करणे रास्त होते. १५ व्या व १६ व्या शतकात पोपचे अप्रत्यक्ष धिपत्य युरोपातील मोठ्या प्रदेशासोबतच अमेरिका खंडांवरही होते. खलिफा बनण्यासाठीची चढाओढ ही मोठ्या प्रदेशावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अधिपत्या गाजविता येण्यासाठीच होती. पण खलिफा पध्दती पोप संस्थेच्या तुलने तेवढी यशस्वी ठरली नाही.

गंम्मत अशी की प्रत्यक्ष साम्राज्यवाद नाहिसा झाला असला तरी धार्मिक साम्राज्यवाद तेवढ्याच तीव्रतेने चालू आहे. ख्रिश्चन पाद्री अजुनही अशिक्षित जनतेमागे धर्मांतर करण्याच्या कामात गर्क आहे. मुसलमान लोक अजुनही दार्-उल-हब्र ची स्वप्ने बघतात आणि जागो-जागी स्फोट घडवुन आणतात. हा जगात 'शांतता' पसरविण्याचा अभद्र आणि बिभित्स खेळ कधी संपणार आहे कोण जाणे?